Sunday, May 10, 2020

शपथ तुला आहे...


ही बातमी ज्या वाहिनीवर दिसत आहे, त्यामुळे ती खरी आहे की नाही याबाबत खात्री देता येत नसली तरी सध्या राज्य ज्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जिवाचा आकांत करीत आहे तो पाहता, असे काही असेलच, तर तो जनतेला वाऱ्यावर सोडून पळ काढण्याचा प्रकार आहे असेच म्हणावे लागेल!


गेल्या अनेक दिवसांपासून आपले मुख्यमंत्री आपल्याला धीर देत आहेत. महाराष्ट्र हा लढवय्या शिवरायांचा देश असून आपण सारे त्यांचे शूर मावळे आहोत असे सांगत आहेत. शत्रू अदृश्य असला तरी आपण त्याच्याशी लढणार, पळ काढणार नाही अशी ग्वाही देत आहेत, आणि कठीण परिस्थितीत राजकारण करू नका असे विरोधकांना बजावले जात आहे.


आता लढाई ऐन मध्यावर आली आहे. जनतेने संकटास तोंड देण्याची हिंमतही जमा केली आहे, आणि विरोधी पक्षांनीही, राजकारण करणार नाही अशी जाहीर हमी दिलेली आहे.

असे सर्व अनुकूल वातावरण असताना, तीन चाकांची रिक्षा अशी अचानक रखडण्याची चिन्हे कशामुळे आली असावीत? विधान परिषदेचे सदस्यत्व मिळून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद निश्चिंत व्हावे यासाठी कालपरवापर्यंत केवढी यातायात केली गेली. राज्यपालांवरही चिखलफेक केली गेली, त्यांची टोपीही उडवण्याचे शाब्दिक पराक्रम झाले, आणि राज्यपालांनीच मार्ग काढून निवडणूक आयोगास विनंती केल्याने विधान परिषदेच्या निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर झाले.
हे सारे, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी पार पडले असताना अचानक ते स्वत:च असे काही इशारे देत असतील, तर सत्तारूढ आघाडीत राजकारण सुरू आहे असा संदेश समाजात जाईल.
ऐन लढाईच्या तोंडावर सेनापतीने माघार घेण्यासाठी निमित्त तर शोधले नाही ना, अशी शंका महाराष्ट्राच्या मावळ्यांच्या मनात येईल.
छत्रपतींचा महाराष्ट्र असा नव्हता, नाही आणि असू नये!
मुऱ्क्य म्हणजे, ‘त्या’ दिलेल्या ‘वचना’चे काय? त्याचा विसर पडून कसे चालेल?

No comments:

Post a Comment