Monday, May 11, 2020

‘खास बातमी’: व्यक्ती विशेष!


आजची ‘खास’ बातमी. व्यक्ति विशेष!

कोणत्याही बातमीचे महत्व वाचकांच्या दृष्टीने किती असते हे लक्षात घेऊन बातमीची लांबी-रुंदी व तपशील आदी बाबी ठरविल्या जातात. प्रत्येक वर्तमानपत्राचा आपला असा एक ‘बांधलेला’ वाचकवर्ग असल्याने त्या वाचकाची ‘नस’ वर्तमानपत्रास नेमकी माहीत असते. ती ओळखूनच बातमी केवढी करावी, किती वेळात ती वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याचे निकष ठरविले जातात. रतन खत्रीच्या निधनाची एवढी लांबलचक बातमी तत्परतेने देताना हे निकष पाळले गेले असावेत यावर विश्वास ठेवायला हवा. कारण प्रश्न वाचकाच्या अभिरूचीचा आहे.

एखाद्या व्यक्तीच्या निधनाचे वृत्त देताना त्या व्यक्तीचे सामाजिक स्थान, कर्तृत्व, चारित्र्य आणि त्या व्यक्तीच्या निधनामुळे होणारी सामाजिक हानी/पोकळी याचा विचार करावा असे संकेत असतात. अशा व्यक्तीच्या निधनानंतर समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत शोकसंवेदना उमटतात. तोही एक निकष मानला जातो.
या बातमीसाठी जेवढी जागा व व्यापक माहिती दिली गेली, तेवढी जागा-माहिती काळाआड जाणाऱ्या प्रत्येकाच्या बातमीसाठी मिळतेच असे नाही. कारण, ‘निकष!’
दोन महिन्यांपूर्वी ९ मार्च रोजी ज्येष्ठ संपादक, अभ्यासू पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन झाले. ती बातमी याच वर्तमानपत्रात तिसऱ्या दिवशी आली. त्याची जागा आणि बातमीचा तपशील पाहिला, की व्यक्तींचे महत्व, वाचकांच्या अभिरूचीचा अंदाज आणि बातमीची जागा यांची नेमकी नस पकडली का, असा प्रश्न पडतो.


No comments:

Post a Comment