Sunday, September 6, 2020

‘करोना’ की ‘कंगना’?





टीव्ही चॅनेलांचा बूम समोर आला की संजय राऊत कंगनाचा उद्धार सुरू करतात. मग चॅनेलवाल्यांनाही चेव चढतो, आणि कंगनाच्या निमित्ताने प्रश्न, चर्चा सुरू होतात.

संजय राऊत हे सध्या चॅनेलवाल्यांसाठी मोस्ट ॲक्सेसिबल आणि ईझिली ॲव्हेलेबल न्यूज सोर्स आहेत. कारण त्यांच्यामुळे चॅनेलींना विनासायास, बसल्या जागी बातम्यांचा खमंग मसाला मिळतो.

करोनाची महामारी कव्हर करणे हा जिवाशी खेळ असल्याने त्यासंबंधीच्या बातमीमागे धावण्याची शक्ती आणि, खरे म्हणजे, हमखास सुरक्षिततेच्या सुविधाही, चॅनेलींच्या प्रतिनिधींकडे नाहीत.

करोना सोडून कंगनाचे कव्हरेज हा सोयीचा पर्याय चॅनेलींनी निवडला व तोच लोकांच्या माथी मारण्यास सुरुवात केली, ती त्यामुळेच.

कंगनाचा वाद हातातून सोडून दिला, तर कव्हर करायला करोनाशिवाय दुसरे काहीच हातात उरणार नाही. प्रेक्षक या कंगनावादास कंटाळले असले तर वाहिन्यांच्या मर्यादांमुळे तोच वाद प्रेक्षकांच्या माथी मारावा लागतोय.

त्यामुळेच, संजय राऊत समोर सहजपणे हजर असताना एकाही चॅनेलमधील हरीचा लाल त्यांना हे विचारण्याचे धाडस का करत नाही, की, ‘खासदार साहेब, कंगनापेक्षा सध्या करोनाचा कहर ही मोठी समस्या असताना तुम्ही त्यावर अवाक्षरही का काढत नाही? राज्यासमोरची सर्वात मोठी समस्या कोणती ?

‘करोना’ की ‘कंगना’??

No comments:

Post a Comment